Central Government Scheme : केंद्र आणि राज्य सरकारतर्फे (Central Government) विविध योजना राबविल्या जात असून त्यामध्ये महिलांपासून गरिबांपर्यंत सर्वांना आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.या सर्व योजनांमध्ये केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा 6000 रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा केला जात आहे.तुम्हालाही या भत्त्याचा लाभ घ्यायचा आहे का…तर जाणून घ्या सरकार खरोखरच हे पैसे देत आहे का?
पीआयबी ने केले फैक्ट चेक
आजकाल अनेक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.सरकार बेरोजगारांना आर्थिक मदत करत असल्याचा दावा संदेशात केला जात आहे.हे पोस्ट पाहिल्यानंतर, पीआयबीने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी फैक्ट चेक केले आहे.
PIB ने ट्वीट केले
एक व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेज मध्ये दावा केला जात आहे की सरकार प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा ₹ 6,000 भत्ता देत आहे.
>> हा मेसेज फेक आहे.
>> भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही.
>> कृपया असे मेसेज फॉरवर्ड करू नका.
फेक मेसेज कोणासोबत ही शेअर करू नका
असे मेसेज कोणाशीही शेअर करू नका, यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा.
वायरल मैसेज चे करू शकता फैक्ट चेक
केंद्र सरकारकडून सांगितले गेले आहे कि अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या कोणाशीही शेअर करू नका.तूर्तास अशा बातम्या फॉरवर्ड करू नका.तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक 918799711259 किंवा [email protected] वर मेल करू शकता