PM-Kisan: सध्या सरकार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi) चालवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात.
आता पीएम किसानशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकारने 6 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत कळवले की, पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ ₹8,000-12,000 प्रतिवर्षी वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. एवढेच नव्हे तर या योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी रक्कम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी ₹2,000 चे तीन हप्ते पाठवले जातात. आतापर्यंत भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांना 15 वा हप्ता मिळाला आहे आणि आता शेतकरी बांधव 16 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात.
त्याचा लाभ आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळणार?
पीएम किसान योजनेची ही रक्कम वार्षिक 8,000-12,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार आहे का, असे विचारले असता? ते म्हणाले, “कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.” मंत्री म्हणाले की, सरकारने आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये दिले आहेत. मंत्री म्हणाले की उत्तर प्रदेशमध्ये योजना सुरू झाल्यापासून 2,62,45,829 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे.
पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार?
अशा परिस्थितीत, 15 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता जारी केला जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अजून काही दिवस वाट पहावी लागेल.
त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच पीएम किसानला पैसे दिले जातील. तुम्ही केवायसी न केल्यास, तुम्हाला पुढील हप्तापासून वंचित राहावे लागेल.