PM Kisan Yojana: PM किसान योजना मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळात सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा म्हणजे दर चार महिन्यांनी 2,000 रुपये देण्याची ही विशेष योजना आणली आहे. यानुसार शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षाला सहा हजार रुपये मिळतात.
सरकारने मंगळवारी संसदेत सांगितले की पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ वार्षिक 6,000 रुपयांवरून 12,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. या योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांची रक्कम वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी संसदेत एका उत्तरात सांगितले.
2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. ही रक्कम 6 हजार रुपयांवरून 12 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार आहे का, असे विचारले असता. याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही आहे.
पीएम किसान योजनेच्या वाढीबद्दल माहिती देताना मंत्र्यांनी लिहिले आहे की, सरकारने आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे दिले आहेत. ते म्हणाले की, जमीनधारक शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे लाभ दिले जातात.
माहितीनुसार, PM किसान योजना ही जगातील सर्वात मोठ्या DBT योजनांपैकी एक आहे. शेतकरी-केंद्रित डिजिटल पायाभूत सुविधांनी हे सुनिश्चित केले आहे की या योजनेचे लाभ मध्यस्थांच्या सहभागाशिवाय देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील.
एका वेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये योजना सुरू झाल्यापासून 2.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळाला आहे. या योजनेच्या परिचालन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, योजनेअंतर्गत पात्र लोकांना ओळखणे आणि त्यांची पडताळणी करणे ही राज्ये आणि प्रदेशांची जबाबदारी आहे.